प.पू.भय्यूजी महाराज यांच्या चौथ्या पुण्यतिथी निमित्त मुंबईत प्रार्थना सभेजे आयोजन .

प.पू.भय्यूजी महाराज यांच्या चौथ्या पुण्यतिथी निमित्त मुंबईत प्रार्थना सभेजे आयोजन .                      
   मुंबई  :साकीनाका येथील प्रसिद्ध द बेस्ट  कोंचिग क्लासेस "गुरूकुल क्लासेस" मध्ये आयोजित प्रार्थना सभेत भय्युजी महाराजांना आदरांजली वाहण्यात आली. मुंबई चे लोकप्रिय आरटीआय कार्यकर्ते अनिल वेदव्यास गलगली साहब म्हणाले की ,भय्यूजी महाराजांनी सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेवून विविध कामांसाठी घेतलेल्या पुढाकाराच्या आज लाखो लोकांना फायदा होत आहे.आजही त्यांच्या वृक्षारोपण ,विहिरी, आश्रम शाळा बांधणे,गरिबांना शिष्यवृत्ति जलसंपदा यासाठी केलेल्या कामांचा समाजाला लाभ होत आहे.राष्ट्वादी पक्षाचे लोकप्रिय लाडके नेते  एड. अरविंद तिवारी साहब म्हणाले की,आज ते आपल्यामध्ये नाहीत ,असे वाटत नाही कारण आज ते सूक्ष्मपणे आपल्यासोबत आहेत आणि आपण सर्वांनी त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालायचे आहे.राष्ट्वादी काँग्रेस चांदीवली तालुकाध्यक्ष बाबू बत्तेली म्हणाले की,ते मानवी रूपाने संत होते.त्यांच्या मार्गावर चालणे हे प्रत्येकाचे ध्येय असले पाहिजे .भाजप  नेते संदीप सिंह म्हणाले की,मी त्यांना गुरू मानत होतो आणि आजही त्यांचे नाव स्मरण करणे ही रोजची प्रथा आहे.यावेळी एड कैलास आगवणे,रमेश चोरे,समाजसेवी शिक्षणतज्ञ चंद्रवीर बंशीधर यादव,अजीज खान,रत्नाकर शेट्टी,सुभाष गायकवाड,किशोर ढमाल,संदीप येजरे,रियाज मुल्ला,मिलिंद पुजारी,शिवाजी लोंढे,विजय शिंगणे,आनंद राणा,योगेश अमीन उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

मीरा रोड मंडल द्वारा बीजेपी जिलाध्यक्ष किशोर शर्मा का सम्मान

बीजेपी नगरसेवक मनोज रामनारायण दुबे का सराहनीय काम

मीरा रोड में धूमधाम से मनाई गई महावीर जयंती